दिवसभरात 2.11 लाख नवे बाधित, 2.83 लाख जणांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करताना कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होत असले तरी कोरोनामुक्तांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 2 लाख 11 हजार 298 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 847 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 83 हजार 135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. एकंदर बुधवारी दिवसभरात सक्रिय रुग्णसंख्या 75 हजार 684 ने कमी झाली आहे. दरम्यान, देशभरात 26 मेपर्यंत लसींचे 20 कोटी 26 लाख 95 हजार 874 डोस देण्यात आले आहेत. बुधवारी दिवसभरात 18 लाख 85 हजार 805 लसीचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत 33 कोटी 70 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी दिवसभरात 22 लाख कोरोना चाचणीचे अहवाल तपासण्यात आले असून पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्क्मयांहून अधिक आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 2 कोटी 73 लाख 69 हजार 93 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकंदर बाधितांपैकी 2 कोटी 46 लाख 33 हजार 951 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 3 लाख 15 हजार 235 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.5 टक्क्मयांवर आहे, तर रिकव्हरी रेट 89 टक्क्मयांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 10 टक्क्मयांहून कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱया स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येबाबत भारत जगात दुसऱया स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.