ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 3 हजार 722 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 134 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 हजार 03 वर पोहचली आहे.
देशात आतापर्यंत 26 हजार 235 कोरोना रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर 49 हजार 216 रूग्णांवर उपचार सुरू असून, एकूण मृतांचा आकडा 2549 झाला आहे.
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात असून तेथील आकडा 9 हजार 267 आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू असून तेथील कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 227 आहे.