ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात विशेष रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. तसेच कोविड केअर सेंटर बनविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर रेल्वेमध्ये 40 हजार बेड ची व्यवस्था देखील करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पुढे ते म्हणाले, देशात आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 421 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासात 354 नागरिकांना कोरोना ची लागण झाली आहे तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना मुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्या 117 वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत 326 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
लॉक डाऊन वाढवण्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, यावर कोणताही निर्णय घेतला गेल्यास कळवण्यात येईल. मात्र, तोपर्यंत सर्वांनी लॉक डाऊन चे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.