बेंगळूर/प्रतिनिधी
देशात गेल्या २४ तासात भारतात ३९ हजार ७४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५३५ रुग्णांना प्राण गमवावे लागले. तर ३९ हजार ९७२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जेमतेम ६५० ने वाढ झाली. कालच्या दिवसात ३९ हजार ७४२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात ५३५ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
देशात आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी १३ लाख ७१ हजार ९०१ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ५ लाख ४३ हजार १३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख २० हजार ५५१ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ४ लाख ८ हजार २१२ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.