ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 380 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 19 हजार 984 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 640 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 50 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 15 हजार 474 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
एएनआय च्या सुत्रानुसार, सरकार कडून रोज दुपारी होणारी परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळाल्या माहितीनुसार, देशातील कोरोना व्हायरस संबधित रोज दुपारी चार वाजता घेण्यात येणारी पत्रकार परिषद आता आठवड्यातून चार वेळा ठराविक दिवशी घेतली जाणार आहे. त्यामुळे आज होणारी परिषद रद्द करण्यात आली आहे. असे सांगण्यात आले आहे.