ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 3 हजार 390 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 56 हजार 342 पोहचली आहे. तर एकूण मृतांचा आकडा 1886 वर पोहचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, देशातील सोळा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 29 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आत्तापर्यंत 16 हजार 540 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दुसऱ्या देशात, राज्यात अडकलेल्यांना परत आणण्याचे काम सुरू आहे. मालदीव मधून भारतीयांना परत आणला जात आहे. तसेच आज विदेशातून आणखी पाच विमाने भारतात येणार आहेत. तर रेल्वे कडून आत्तापर्यंत 222 विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. विमान आणि जहाजातून देखील भारतीयांना आणले जात आहे. तसेच जे लोक विदेशात जाऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी देखील सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
21 हॉस्पिटल मध्ये प्लाज्मा थेरपीच्या क्लिनिकल टेस्टला परवानगी देण्यात आली आहे, असं आरोग्य विभागाकडून यावेळी सांगण्यात आले.