ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात दैनंदिन रुग्णसंख्येने 3.5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.मागील 24 तासात 3 लाख 52 हजार 991 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनचा दैनंदिन रुग्णवाढीचा हा सर्वात मोठा आकडा आहे. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. रविवारी 2 लाख 19 हजार 272 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2812 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात आतापर्यंत 1 कोटी 73 लाख 13 हजार 163 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 43 लाख 04 हजार 382 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 28 लाख 13 हजार 658 रुग्ण उपचार घेत असून, 1 लाख 95 हजार 123 रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 14 कोटी 19 लाख 11 हजार 223 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 27 कोटी 93 लाख 21 हजार 177 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 14 लाख 02 हजार 367 कोरोना चाचण्या रविवारी (दि.25) करण्यात आल्या.