ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोरोनामुळे भारतासह जगभरात बेरोजगारीच्या संकटात वाढ झाली आहे. लॉकडाऊन केल्यानंतर अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. आता हळू हळू सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे लादण्यात आलेले निर्बंधही हटवले जात आहेत. आता भारतातील बेरोजगारीबाबतची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये देशात बेरोजगारी दरात घट झाली आहे.
२०२२ मध्ये बेरोजगारी कमी होऊन ६.५७ टक्क्यावर आली आहे. मार्च २०२१ नंतर ही सर्वात कमी आहे. सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, शहरी भागात बेरोजगारी दर ८.१६ टक्के इतका झाला आहे. तर ग्रामीण भागात ५.८४ टक्के इतका आहे. डिसेंबर २०२१ मध्ये एकूण बेरोजगारी दर हा ७.९१ टक्के नोंदवला होता. यात शहरी क्षेत्रात ९.३० टक्के तर ग्रामीण भागात ७.२८ टक्के बेरोजगारी नोंद करण्यात आली होती