प्रतिनिधी/ सातारा
राज्य पोलीस दलाचे काम अतिशय उत्कृष्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी कालच महाराष्ट्राचे पोलीस दलाचे काम देशात चांगले आहे, असे सांगितले. पोलीस दलातील अधिकाऱयांपासून शिपायापर्यंत स्वतःला झोकून देवून काम करतात. त्यांना प्रोत्सहन देणं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणं, मी या विभागाचा मंत्री म्हणून माझं कर्तव्य माझी जबाबदारी आहे. आमचे पोलीस निश्चितपणे चांगलं काम करतात, असे गौरवोद्वगार राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काढले.
पोलीस उन्नत दिनाच्या निमित्ताने वाहतूक शाखेच्या येथे प्रबोधन बोर्डाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्यासह वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आज 2 जानेवारी पोलीस स्थापना दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा करत असतो. आजच्या पार्श्वभूमीवर विशेषतः शहरात सुरक्षा वाहतूकीच्या अनुषंगाने करायच्या उपाययोजना त्याची जनजागृती करायचा एक फलक आमच्या वाहतूक शाखेने लोकांच्यासाठी लावलेला आहे. औपचारिक अनावरन झालं. आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना कालच विशेष पोलीस पदक केंद्राच एक आणि राज्याचे एक अशी दोन विशेष पोलीस पदक मिळाली आहेत. त्यांचा गडचिरोलीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जिह्यातील पहिलं पोस्टींग आहे. अतिशय चांगली शिस्त लावायची ते काम करताहेत. मी व्यक्तीशः अभिनंदन करतो. सातारा जिह्याच्या त्यांच्या कारकिर्दीत अतिशय चांगल काम होत आहे. अतिशय शिस्तबद्द काम होत असून कायदा सुव्यवस्था राखण्याचे कामच होईल, असा मला विश्वास आहे.
चौकट
गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी रात्रग्रस्त वाढवली पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सातारा जिह्यातील गुन्हेगारींला आळा बसवण्यासाठी जे संवेदनशील भाग आहेत त्या भागात व शहरी भागात रात्र गस्त वाढवली आहे. अनेक हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांना लगाम लावला आहे, असे सांगत पोलीस अधीक्षक म्हणाले, सायबर क्राईमच्या अनुषंगाने शाळा, कॉलेजमध्ये प्रबोधनात्मक अभियान राबवण्यात येणार आहे. सायबर क्राईम शाखा सक्षम बनवली आहे, असेही त्यांनी सांगितले.