नवी दिल्ली/प्रतिनिधी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अद्यापही टळलेला नाही. नवीन रुग्णांच्या संख्येत दररोज कमी जास्त होत आहे. शनिवारी देशात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. दरम्यान, केरळ आणि महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांमध्ये, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या देशासाठी चिंतेचे कारण ठरत आहेत. या राज्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, तिसऱ्या लाटेचा इशारा आधीच देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठा दिलासा मिळाला आहे.
देशात मागील २४ तासात २८ हजार ५९१ नविन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता देशातील एकूण कोरोना संक्रमित लोकांची संख्या तीन कोटी ३२ लाख ३६ हजार ९२१ वर पोहोचली आहे.
देशात तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांमध्ये २८,५९१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३३८ करोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. ३४,८४८ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.