ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील 135 औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांपैकी 72 केंद्रांमध्ये 3 दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे देशात वीज निर्मितीचे मोठं संकट उभे राहिले असून, काही भागात बत्ती गूल होण्याची शक्यता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने वर्तवली आहे.
देशातील 135 औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये एकूण 66.35 टक्के विज निर्मिती केली जाते. 72 केंद्रांमधील कोळशाचा साठा संपत आला आहे. या वीज प्रकल्पांना साठा संपण्यापूर्वी कोळसा उपलब्ध करुन दिला नाही तर हे प्रकल्प बंद पडू शकतात. असे झाल्यास 33 टक्के विजेची निर्मिती कमी होऊ शकते. देशात दोन वर्षात कोळशाचा वापर 18 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, कोळशाची उपलब्धता होत नसल्याने वीज निर्मिती करण्यात अडचणी येणार असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येते.