ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना संक्रमणाचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र, कोरोना मृतांचा वाढता आकडा आता चिंताजनक आहे. मंगळवारी देशभरात उच्चांकी 4529 रुग्णांचा मृत्यू झाला. यामधील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले. महाराष्ट्रात 679, त्यापाठोपाठ कर्नाटकात 525, तामिळनाडूत 364 तर उर्वरित 2961 मृत्यू देशातील विविध राज्यातील आहेत. आतापर्यंत देशात 2 लाख 83 हजार 248 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
दरम्यान, मागील 24 तासात देशात 2 लाख 67 हजार 334 नवे संक्रमित रुग्ण आढळले. तर 3 लाख 89 हजार 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशात आतापर्यंत 2 कोटी 54 लाख 96 हजार 330 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 19 लाख 86 हजार 363 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 32 लाख 26 हजार 719 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत देशातील 18 कोटी 58 लाख 09 हजार 302 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.