ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
कोरोनाचा देशभर हाहाकार सुरु असून कोरोना संकटासमोर व्यवस्था हतबल होत असल्याचे अनेक वेळा स्पष्ट होत आहे. कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी अनेक राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर देशातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक ही राज्ये कोरोनाचे नवे हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहेत. देशभर अशी भयंकर स्थिती असताना कोरोनाने होणाऱ्या मृत्यूला केंद्रसरकाच जबाबदार आहे, असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.
गेल्या 2 महीन्यात देशभरात एक लाख पेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जवळपास देशातील प्रत्येक कुटूंब कोरोना ने भयग्रस्त झालेला आहे. यामुळेच तर संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. गरज नसताना केंद्र सरकारने 6.6 कोटी कोरोनावरील लस तब्बल 93 देशांना निर्यात केली. आणि देशातील नागरिकांना मृत्यूच्या कराल दाडेत सोडल आहे.
भारतीयांची चिंता जगभरात करणे ही देशवासीयांसाठी चांगली बाब आहे. जगातील अमेरीका, कॅनडा, यूरोप यांसारखे देश सर्वप्रथम आपल्या नागरिकांचे लसीकरण करत आहेत. केवळ फ्रांसने एक लाख लसी निर्यात केल्या आहेत. मात्र देश कोरोना महामारीच्या कराल दाढेत सापडला असताना भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार 6.6 कोटी लस दान देऊन बसल्याचे सिसोदिया यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे. दुसऱ्या लाटेत तरुणांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आतातरी डोळे उघडून देशाला प्राथमिकता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.