ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 2 कोटी 88 लाख 09 हजार 339 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 69 लाख 84 हजार 781 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, 14 लाख 77 हजार 799 रुग्ण उपचार घेत आहेत.
शनिवारी देशभरात 1 लाख 14 हजार 460 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1 लाख 89 हजार 232 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 2677 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 46 हजार 759 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 23 कोटी 13 लाख 22 हजार 417 जणांना लस देण्यात आली आहे.