ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जागतिक महामारीविरूद्धच्या लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. केवळ 19 दिवसांत सुमारे 45 लाख (44,49,552) लाभार्थ्यांचे कोविड 19 विरोधी लसीकरण करण्यात आले आहे.
केवळ 18 दिवसांत 40 लाख लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारा भारत सर्वात वेगवान देश ठरला आहे. इतर अनेक देशांमध्ये जवळजवळ 65 दिवसांपूर्वी लसीकरणाला सुरूवात झाली आहे. भारताने 16-1-2021 रोजी देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू केली.
गेल्या 24 तासांत 8,041 सत्रांमध्ये 3,10,604 लोकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत,84,617 सत्रे घेण्यात आली आहेत. आज भारताचा दैनंदिन सकारात्मकता दर 1.82% आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये (19 दिवस) भारताने दैनंदिन सकारात्मकतेचा दर 2 टक्क्यांच्या खाली ठेवला आहे.
बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,04,80,455 झाली आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आज 97.13 टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या उपचाराधीन रुग्णसंख्येच्या 67.6 पट आहे. बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 86.04 टक्के रुग्ण 6 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.
नवीन मृत्यूंपैकी 71.03 टक्के मृत्यू सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. महाराष्ट्रात काल सर्वाधिक (30) मृत्यू झाले. केरळमध्ये 20 तर पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यात प्रत्येकी 7 मृत्यूची नोंद झाली आहे.