ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 41 हजार 526 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 2 कोटी 65 लाख 97 हजार 655 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
41 हजार नवे रुग्ण
शनिवारी देशात 41 हजार 506 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 895 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 3 कोटी 08 लाख 37 हजार 222 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 4 लाख 08 हजार 040 रुग्ण दगावले आहेत.
आतापर्यंत देशातील 37.60 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.