नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आपला तिसरा राष्ट्रीय सीरो आपला सर्व्हे पूर्ण केला आहे. या सर्व्हेमध्ये देशातील 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेल्याचा दावा करण्यात आला आहे. येत्या काळात अजूनही मोठय़ा लोकसंख्येवर हा धोका कायम असल्याचे या सर्व्हेच्या अहवालातून सांगण्यात आले आहे. आयसीएमआरने आपला तिसरा सीरो सर्व्हे 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी केला होता. त्यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी याविषयी माहिती दिली.
28,589 लोकसंख्येपैकी 21.4 टक्के लोकांमध्ये कोरोनाची बाधा होऊन गेली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 19.1 टक्क्मयांच्या तुलनेत शहरी झोपडपट्टीतील 31.7 टक्के लोकसंख्या आणि 26.2 टक्के इतर लोकसंख्येमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे असेही डॉ. भार्गव यांनी सांगितले. 60 वर्षावरील 23.4 टक्के लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली आहे तर 7,177 आरोग्य कर्मचाऱयांपैकी 25.7 टक्के कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याचे हा अहवाल सांगत आहे. राष्ट्रीय सीरो सर्व्हेच्या पहिल्या आणि दुसऱया टप्प्यात 21 राज्यांतील 70 जिह्यामधील 700 गावांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. जगाला हैराण करून सोडणाऱया कोरोनाचा धोका लसीकरणामुळे काही प्रमाणात कमी होण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजूनही कोरोना पूर्णपणे आटोक्मयात आलेला नाही.