ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सोमवारी 30 हजार 093 नव्या संक्रमितांची नोंद झाली. 45 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 374 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 3 कोटी 11 लाख 74 हजार 322 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 कोटी 03 लाख 53 हजार 710 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत देशात 4 लाख 14 हजार 482 उपचारार्थ रुग्ण आहेत. तर 4 लाख 06 हजार 130 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात आतापर्यंत 41.18 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.