ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 18,006 टन कोविड जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून, महाराष्ट्रात 3587, गुजरात 1638, तामिळनाडूत 1737, पश्चिम बंगालमध्ये 1 हजार टन, केरळमध्ये 1516, दिल्लीत 1400 टन कचरा तयार झाला आहे. या कचऱ्यात डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारी वापरत असलेले पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज, बुटांची अच्छादने, सूया, सिरिन्ज, प्लास्टरसाठी वापरलेले साहित्य, पिशव्या यांचा समावेश आहे.
या कचऱ्याची 198 जैववैद्यकीय कचरा प्रकल्प सुविधा युनिटद्वारे विल्हेवाट लावण्यात येत आहे.