ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात आतापर्यंत 3 कोटी 07 लाख 95 हजार 716 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 99 लाख 33 हजार 538 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सध्या 4 लाख 55 हजार 033 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात शुक्रवारी 42 हजार 766 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 45 हजार 254 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 1206 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 4 लाख 07 हजार 145 एवढी आहे.