ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत 59.68 लाख करदात्यांना 1,40,210 लाख कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वावलंबी भारत योजना जाहीर केल्यानंतर आयकर विभागाने परताव्याची प्रक्रिया अधिक तीव्र केली. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात करदात्यांना मोठा दिलासा मिळाला. यंदा कोणालाही आयकर विभागाकडे परताव्याची विनंती करावी लागली नाही. सीबीडीटीने म्हटले होते की, सर्व करदात्यांनी आयकर विभागाच्या ईमेलला तात्काळ प्रतिसाद द्यावा जेणेकरून ज्यांना परतावा मिळू शकला नाही, त्यांनाही लाभ मिळू शकेल. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली.
करदाते आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला किंवा एनएसडीएलच्या वेबसाईटला भेट देऊन त्यांच्या आयकर परताव्याची सद्यस्थिती निश्चित करू शकतात. मार्च 2019 पासून केवळ ई-रिफंड जारी केले जातील, असे आयकर विभागाने जाहीर केले होते. ते फक्त पॅन कार्डशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केले जाईल.