ऑनलाईन टीम / मुंबई
राजकारण ही एका ठराविक ऊंचीवर ठेवत राजकारण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार यांनी एखादा युवक कसा असावा ?अथवा राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता कसा असायसा हवा, यावर आज भाष्य केले. ते वरळीतील नेहरु सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना पवार यांनी देशासमोर असणारे असंख्य प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असला पाहिजे, असं प्रतिपादन केले.
पवार यांनी सामाजिक बांधिलकी असणारे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचं वैशिष्ट आहे. आणि म्हणून आज जे असंख्य प्रश्न सामान्य लोकांच्या समोर आहेत. त्याच उत्तर शोधण्यासाठी आणि सामान्यांची यातुन सुटका करण्यासाठी प्रभावीपणे काम करणारा पक्षाचा कार्यकर्ता कोणता ? हा निष्कर्ष लोकांनी काढताना तो राष्ट्रवादी काँग्रेसचं असू शकतो, असं झालं पाहिजे. समाजातील लहान घटकांना सोबत घेऊन पक्षाची बांधणी करायला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी जयंत पाटलांनी पवारांना शुभेच्छा देत वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केले. देशातील कोणत्याही नेत्याला पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं, असं जयंत पाटील म्हणाले.
समाजातील दलित-उपेक्षित लोकांवर अन्याय अत्याचार झाले त्याची अस्वस्थता दुर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्या हे ऐकल्यानंतर अस्वस्थ झाला तरच तो खरा कार्यकर्ता आहे. आदिवासी समाजातील तरुण आज अनेक अडचणी, नक्षलवादाचा त्रास सोसून आजची तरुण पिढी शिक्षित होण्यासाठी धडपडत आहे, पुढे जायचा विचार करत आहे. त्यांच्याशी राजकीय विचारधारेबाबत चर्चा केली तर ते सांगतील की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार मंजूर आहे. या लोकांच्या जास्त काही अपेक्षा नाहीत या जगात आम्हाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. तो आम्हाला द्या एवढचं त्यांचं म्हणण आहे. त्यामुळं जो कार्यकर्ता अस्वस्थ माणसाच्या सुख-दुःखाशी समरस झाला नाही. तो खरा कार्यकर्ता नाही, असंही यावेळी शरद पवार म्हणाले.