खानापूर / वार्ताहर
हुबळी दक्षिण मध्य रेल्वे विभागाने आता बेळगाव ते धारवाड हा जवळचा रेल्वेमार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. यानुसार बेळगावहून के. के. कोप्प मार्गे जाणाऱया नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण हाती घेतले जात आहे. देसूर, गर्लगुंजी ते नंदिहळळी, के. के. कोप्प मार्गे नवीन रेल्वे मार्गाचे मार्किंग करण्याची प्रक्रिया हाती घेतली जात आहे. पण या भागातील शेतकऱयांना यासंबंधी कोणतीच पूर्वसूचना अथवा नोटीस नसताना शेतकऱयांच्या शेतात खांब रोवण्याची प्रक्रिया एका कंत्राटदारामार्फत रेल्वे विभागाने हाती घेतली असल्याचे समजताच, शनिवारी गर्लगुंजी, नंदिहळळी भागातील अनेक शेतकऱयांनी एकत्र येऊन त्या कंत्राटदारांला कडवा विरोध केला व शेतात रोवलेले खांब उपटून टाकून सज्जड इशाराही दिला आहे. यावेळी गर्लगुंजी येथील प्रसाद पाटील, पुंडलिक मेलगे, राजू पाटील, परशराम जाधव, किरण लोंढे, संगाप्पा कुंभार, सोमनाथ पाटील यासह नंदिहळळी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
हुबळी दक्षिण मध्य रेल्वे भागाने आता बेळगाव ते धारवाड जवळचा रेल्वे मार्ग साकारण्याची प्रक्रिया हाती घेऊन तशी अंतरिम मंजुरीही घेतली आहे. यानुसार बेळगावहून के. के. कोप्प मार्गे नवीन रेल्वे मार्ग काढण्यासाठी सर्वेक्षण प्रक्रियाही हाती घेतली जात आहे. यासाठी बेळगावहून के. के. कोप्प मार्गे जाणाऱया दोन पर्यायी रेल्वे मार्गासाठी जाणाऱया जमिनीची उजळणीही रेल्वे विभागाने घेतली आहे. यामध्ये येरमाळ-मजगाव मार्गे एक पर्यायी रेल्वे मार्गासाठी पर्यायी दिशा आखली आहे. तर दुसरी देसूर रेल्वे जंक्शनपासून गर्लगुंजी, नंदिहळळी, के. के. कोप्प मार्गे रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी हालचाली सुरू आहेत. यानुसार शनिवारी गर्लगुंजी, नंदिहळळी भागात कणवीकडे मार्किंगचे खांब घालण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. पण याबाबत एकाही शेतकऱयाला रेल्वे विभागाने पूर्व कल्पना दिली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱयांनी एकत्र येऊन त्याला कडवा विरोध केला. व घातलेले खांब उपटून टाकले.
…तर शेतकऱयांचे मोठे नुकसान
गर्लगुंजी, नंदिहळ्ळी या मार्गे नियोजित रेल्वे मार्ग झाल्यास शेतकऱयांचे मोठे नुकसान होणार आहे. या मार्गात शेतकऱयांची मोठय़ा प्रमाणात पिकावू जमीन जाते. गर्लगुंजी येथील जवळपास 150 हून अधिक शेतकऱयांची शेकडो एकर जमीन या रेल्वे मार्गामध्ये जाण्याची शक्मयता आहे. शिवाय नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, नागीरहाळ भागातील अनेक शेतकऱयांची शेकडो एकर जमीन या रेल्वे मार्गासाठी जाऊ शकतात. त्यामुळे अनेक शेतकऱयांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे देसूर-गर्लगुंजी मार्गे नियोजित या पर्यायी रेल्वे मार्गाचा या भागातील शेतकऱयांनी कडवा विरोध केला आहे.
प्रसंगी लढा उभारु
वास्तविक कोणत्याही जमिनीवर ताबा घेण्याअगोदर रीतसर नोटीस अथवा संबंधित शेतकऱयांना विश्वासात घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे असताना रेल्वे विभागाने हाती घेतलेला हा रेल्वेमार्गाचा प्रस्ताव चुकीचा असून शेतकऱयांचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. संबंधित शेतकऱयांना कोणतीही पूर्वसूचना नसताना शेतात येऊन बांधकाम करून खांब रोवणे किंवा त्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचे आहे. सदर जमीन हातातून गेल्यास शेतकऱयांनी जगावे कसे, असा प्रश्न उपस्थित करून आलेल्या त्या कंत्राटदाराला जाब विचारून तिथून परतावून लावले. प्रसंगी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
खानापूर तालुका पंचायत बैठकीत विरोधी ठराव
नियोजित रेल्वेमार्गासाठी जाणारी सर्व जमीन पिकावू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱयांवर बेकार तसेच उपसमारीची वेळ येणार असल्याने या भागातून जाणारा नियोजित रल्वेमार्ग रद्द करावा, अशा मागणीचा ठराव दोन दिवसापूर्वी झालेल्या खानापूर तालुका पंचायतीच्या त्रैमासिक बैठकीत ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत यानी मांडला. त्याला सदस्यानी एकमताने संमती दिली.
प्रतिक्रीया : शेतकऱयाना संघटित करुन लढा उभारणार-प्रसाद पाटील
रेल्वे विभागाने बेळगाव ते धारवाडला जाणारा जवळचा नवा रेल्वेमार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी यापूर्वी या मार्गाचा यरमाळ मार्गे प्रस्ताव हाती घेण्यात आला होता असे समजते. परंतु सदर मार्गात बडय़ा लोकांच्या जमिनी जाणार असल्याने त्याऐवजी आता देसूरहून गर्लगुंजी, नंदिहळ्ळी के. के. कोप्प मार्गे दुसरा मार्ग शोधण्यात आला आहे. पण या मार्गात शेतकऱयांच्या शेकडो एकर जमिनी जाणार असल्याने अनेक शेतकऱयावर उपासमारीची वेळ येणार असल्याने या मार्गाला या भागातील शेतकऱयांचा कडवा विरोध होणार आहे. असे असताना या मार्गे पिकावू जमिनीतून रल्वे मार्ग काढण्याचा प्रयत्न झाल्यास एकसंघ राहून लढा उभारला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.