दोडामार्ग / प्रतिनिधी:
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे हे रविवारी 29 रोजी आडाळीत येत आहेत. राज्याचे उद्योमंत्री असतानाना अवघ्या सहा महिन्यात श्री. राणे यांनी आडाळी येथे MIDC प्रकल्प मंजूर केला होता. दोडामार्ग व सावंतवाडीसह जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता या midc प्रकल्पत आहे. हा प्रकल्प मंजूर करताना त्यांची धडाडी काय आहे याचा प्रत्यय आला होता. आज योगायोगाने ते पुन्हा केंद्रात उद्योग खात्याचे मंत्री आहेत. आडाळी ला midc मी मंजूर केली आहे, त्यामुळे तिथे उद्योग यायला हवेत त्यासाठी माझा निश्चित प्रयत्न आहेत, असे त्यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यावर अनेकदा सांगितले आहेत. रविवरी दुपारी 2 वाजता ते स्वतः आडाळीत येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील बहुसंख्य तरुण -तरुणीनी आडाळीत उपस्थित राहून आपली रोजगाराची मागणी त्यांच्यासमोर नोंदवावी. आडाळीत उद्योगानाची उभारणी करण्याचे आश्वासन आपण त्यांच्याकडून घेऊया. विकासासाठी एकत्र येऊया आणि बेरोजगारांना काम, कामाला योग्य दाम ही आमची भूमिका ठेऊन काम करूया. आडाळी midc मध्ये केंद्र सरकारचा आयुष मंत्रालयाचा एक प्रकल्प मंजूर असून राज्य शासनाने त्यासाठी 50 एकर जागा दिली आहे. या प्रकल्पचे काम लवकरच सुरु होईल. यातून अनेकांना रोजगार मिळेल. केंद्राचे अन्य प्रकल्प आडाळीत यावेत यासाठी नारायण राणेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यातील जनतेने रोजगाराच्या मुद्यायावर आमच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी आणि जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केले आहे