वार्ताहर / सावंतवाडी:
मुंबई, पुणे या कोरोना हॉटस्पॉट भागातून लोक मिळेल त्या वाटेने गावी येत आहेत. मुंबई, पुणे येथून गावी येणाऱयांचे प्रमाण घटण्याऐवजी वाढतच चालले आहे. गुरुवारी मुंबईहून आरोंदा गावात एक व्यक्ती येताच त्याला क्वारंटाईन करण्यात आले. त्याच्यावर गुन्हाही दाखल केल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. तसेच तिलारी पाटबंधारे विभागात दोन प्रमुख अधिकारी मुंबई-ठाणे भागातून रुजू होण्यासाठी आले होते. त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे भागात लॉकडाऊनमुळे अडकलेले सावंतवाडी तालुक्यातील
लोक मिळेल त्या वाहनाने गावी येत आहेत. त्यांच्यावर संचारबंदीचा नियम
तोडल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात
येत आहे. 20 एप्रिलपासून शासकीय कार्यालय, उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. जिल्हा प्रशासनाचे
जे अधिकारी, कर्मचारी बाहेर गावी होते त्यांना कामावर रुजू होण्याचे फर्मान काढले आहे.
त्यामुळे मुंबई-पुणे, कोल्हापूर येथे गेलेले अधिकारी व कर्मचारी सिंधुदुर्गात कामावर
रुजू होण्यास येत आहेत. या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. अहवाल येईपर्यंत
त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी आपल्या गावीच
रजेवर राहणे पसंत करत आहेत.