केंद्रात 25 ते 28 नव्या चेहऱयांना संधी शक्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तार येत्या दोन-तीन दिवसांत होऊ शकेल, अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱया कार्यकाळातील हा पहिलाच विस्तार असेल. हा फेरबदल 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुका आणि पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह काही राज्यात होणाऱया विधानसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या 53 मंत्री असून फेरबदलामध्ये 25 ते 28 नव्या चेहऱयांना संधी दिली जाणार असल्याचे समजते. मध्यप्रदेशमधील नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचा या विस्तारात प्राधान्याने समावेश होऊ शकतो. त्यांच्या काँग्रेसबरोबरच्या मतभेदांमुळे गेल्यावषी मध्य प्रदेशात भाजपची सत्ता परत आली. याशिवाय आसाममधील सर्वानंद सोनोवाल यांनाही संधी मिळू शकते. त्यांनी आसाममध्ये भाजपला सत्तास्थानी आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तसेच आपल्याकडील मुख्यमंत्रिपद हिमंता बिस्वा सरमा यांच्यासाठी रिक्त केले होते. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, प्रितम मुंडे, पुनम महाजन यांच्या नावाचीही चर्चा आहे.
अतिरिक्त भार होणार हलका
नव्या विस्तारात काही विद्यमान मंत्र्यांना डावलले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सध्या 9 मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खात्यांचा भार आहे. यामध्ये प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, डॉ. हर्ष वर्धन, नरेंद्रसिंह तोमर, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी आणि हरदीपसिंग पुरी यांचा समावेश आहे. नव्या चेहऱयांना संधी मिळाल्यानंतर या मंत्र्यांकडील काही खाती नव्या मंत्र्यांकडे दिली जाणार आहेत.
उत्तर प्रदेशला झुकते माप
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राज्याला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देव सिंह, पंकज चौधरी, वरुण गांधी आणि अनुप्रिया पटेल अशी चार नावे पुढे आली आहेत. राज्यसभेचे खासदार अनिल जैन, ओडिशाचे खासदार अश्विनी वैष्णव आणि वैजयंत पांडा, पश्चिम बंगालचे माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचा समावेश होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
मित्रपक्षांनाही सामावून घेणार
बिहारमधील राजकीय उलथा-पालथीनंतर चिराग पासवान यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱया पशुपती पारस यांना एलजेपीकडून संधी मिळण्याची शक्मयता आहे. त्याचप्रमाणे जेडीयूतर्फे आर.सी.पी. सिंग आणि संतोष कुमारही या यादीत आहेत. कर्नाटकमधून राज्यसभेचे खासदार राजीव चंद्रशेखर यांना संधी मिळू शकते. तर, दिल्लीतून खासदार मिनाक्षी लेखी यांच्या गळय़ातही मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.