प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घरगुती गणेशमूर्तींची उंची 2 फुट ठेवण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत़ अचानक आलेल्या शासनाच्या या आदेशाने गणेशभक्तांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच गणेशमूर्तींसाठी पाट देण्याला सुरूवात होत़े मूर्तीच्या काम अंतिम टप्प्यात आले आहे. रंगकामाला सुरूवात झाली असतानच शासनाच्या सूचना आल्या आहेत. त्यामुळे आयत्यावेळी मुर्तींची उंची कशी कमी करणार असा संभ्रम गणेशभक्तांमध्ये निर्माण झाला आह़े
कोकणातील प्रमुख सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जात़े मुंबई-पुण्यातून मोठय़ा प्रमाणावर चाकरमानी गावच्या गणपतीसाठी येत असतात़ याचा विचार करून शासनाने सोशल डिस्टंगसिंगचे पालन करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होत़े तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची उंची 4 फुट तर घरगुती गणपतींची उंची 2 फुटांपर्यंत ठेवावी असे निर्देश दिले होत़े मात्र महिन्याभरापूर्वीच गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत़ त्यांची उंची कमी कशी करणार असा प्रश्न मूर्तीकार व गणेशभक्तांसमोर आला आह़े
रत्नागिरी जिह्याचा विचार करता 1 लाख 66 हजार 587 घरगुती तर 110 सार्वजनिक 110 सार्वजनिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत़े देशात कारोनाची सुरूवात झाल्यानंतर सर्वच सण हे अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले होत़े कोरोनाची चैन तोडवयाची झाल्यास सोशल डिस्टंसिंग, गर्दी टाळणे गरजेचे झाले आह़े त्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आह़े
तसेच पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू अथवा संगमरवरापासून बनवलेल्या मूर्तींचे पूजन कराव़े शाडूची किंवा पर्यावरण पूरक असल्यास घरच्या घरी विर्सजन करावे अशा सूचना देखील राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत़ गणेशउत्सवात बाजारपेठा फुललेल्या दिसून येत असतात़ खरेदीसाठी लोकांची झुबंड असत़े यावर्षी कारोनाचे आलेले संकट लक्षात घेता गणपतीच्या सजावटीमध्ये साधेपणा ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आह़े त्याचप्रमाणे आरती, भजन किर्तन, व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत़
यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट स्पष्टपणे दिसून येत आह़े सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींना देखील सामोरे जावे लागत आह़े त्यामुळे गणेशभक्तांनी उंची कमी ठेवण्याचा स्वतःहून निर्णय घेतला आह़े तरीदेखील काहींनी 2 फुटांवरील मूर्तींची मागणी केली आह़े दोन महिन्यांपूर्वी याची शासनाकडून निर्णय घेतला गेला असता तर ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे राबवता आली असत़ी मात्र अचानक घेतलेल्या निर्णयामुळे संभ्रमावस्थ निर्माण झाली आह़े