व्यापाऱयांमध्ये उत्साह, खरेदीसाठी लगबग
प्रतिनिधी /बेळगाव
दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी दिवसभर बाजारपेठ गजबजली. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खरेदीला मुभा देण्यात आल्याने खरेदीसाठीची लगबग दिसून आली. अनेक दिवसानंतर सायंकाळी 6 नंतर बाजारपेठ सुरू असल्याचे चित्र दिसत होते. खरेदीसाठी उत्साह असल्याने व्यापाऱयांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
अनलॉक 3 मुळे लॉकडाऊनची नियमावली शिथिल करण्यात आली. यापूर्वी केवळ फळे, भाजी, दूध, व औषधे यांच्या विक्रीलाच सायंकाळी उशीरापर्यंत परवानगी होती. परंतु आता सर्वच व्यवहार रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने सोमवारी रात्रीपर्यंत बाजारपेठ गजबजलेली दिसून आली. दिवसभर कामावर गेलेला नोकरवर्गही सायंकाळनंतर खरेदीसाठी बाजारात दाखल होत असल्याचे चित्र दिसून आले. बाजारपेठेची वेळ वाढविण्यात आल्याने लहान विपेत्यांपासून मोठय़ा विपेत्यांपर्यंत प्रत्येकाच्याच हाताला काम मिळू लागले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी
दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा बाजारपेठा खुल्या झाल्या. किराणा मालासह इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. गणपतगल्ली, मारूती गल्ली, काकतीवेस रोड, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, बसवाण गल्ली, नरगुंदकर भावे चौक, कलमठ रोड, रविवार पेठ, टेंगीनकेरा गल्ली, भातकांडे गल्ली, बापटगल्ली, पांगुळगल्ली, खडेबाजार या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर आता सर्वच कार्यालये, व्यवसाय, उद्योग सुरू झाले आहेत. आठवडय़ाचा पहिलाच दिवस असल्याने प्रत्येकालाच कार्यालयात वेळेवर पोहोचायचे होते. परंतु वाहने रेटण्याच्या नादात सर्वचजण या वाहतूक कोंडीत अडकून पडले. यामुळे वेळेत कार्यालयात पोहोचणे काहींना शक्मय झाले नाही. मागील आठवडय़ाप्रमाणे या आठवडय़ातही सोमवारी बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती.
कपडे, पावसाळय़ासाठी प्लास्टिक, भांडी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल व एक्ससरीज, धान्य, गृहोपयोगी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी दाखल झाल्याचे दिसून आले. दुपारनंतर मात्र बाजारातील गर्दी हळूहळू ओसरू लागली. परंतु बऱयाच दिवसानंतर खरेदीसाठी उत्साह दिसून आल्याने व्यापाऱयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.