ही कहानी महिला स्वयंसाहाय्य संकल्पनेतून मिळालेल्या अभुतपूर्व यशाची आहे. बुंदलखंड येथील दोन महिलांनी एकत्र येऊन 2019 मध्ये एक दुग्धोत्पादन कंपनीचा प्रारंभ केला. प्रारंभी त्यांनी महिला स्वयंसाहाय्य योजनेतून काही कर्जाची उचल केली. राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका अभियान (एनआरएमएल) आणि राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडल यांनी या प्रकल्पात या महिलांना साहाय्य केले. या दोन महिलांनी आपले अंगभूत व्यावसायिक कौशल्य आणि बाजारपेठेचा अभ्यास यावर मिळालेल्या संधीचे सोने केले. अवघ्या दोन वर्षात कंपनीची उलाढाल 100 कोटी रुपयाहून अधिक झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
बलिनी दुग्ध उत्पादन कंपनी असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. कंपनीच्या दोन संचालिकांपैकी एकीचे नाव अंजनी असे असून तिचे शिक्षण केवळ दहावीपर्यंतचे आहे. तर दुसरी संचालिका उमाकांती या नावाची असून तिचेही शिक्षण कमीच आहे. त्यांच्या या प्रयोगापूर्वी बुंदेलखंड येथील अनेक दुग्ध कंपन्या तोटय़ात गेल्या होत्या. तथापि या दोघींनी जे यश मिळविले आहे त्यातून इतर अनेकांना प्रोत्साहन मिळत असून येत्या काही वर्षांत बुंदेलखंड भाग दुधाची राजधानी बनेल, असे बोलले जात आहे. सरकारनेही या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले असून आणखी साहाय्य करण्याची इच्छा दर्शविली आहे.