शिक्षक, पालकांच्याकडून मुलांचे उत्साहात स्वागत
प्रतिनिधी /वाळपई
राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने दिलेल्या निर्देशांचे पालन करून सत्तरी तालुक्मयातील सर्व विद्यालयात तब्बल दोन वर्षांनंतर आज मुलांनी हजेरी लावली आणि शाळा पुन्हा गजबजल्या. मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व्यवस्थापन समितीचे सभासद पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष, सभासद यांनी मुलांचे वेगवेगळय़ा प्रकारे स्वागत केले. यामुळे मुलांनी आनंदित मुदेने विद्यालयात प्रवेश केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारने सर्व शाळा, कॉलेजेस बंद ठेवल्या होत्या. आठ दिवसापूर्वी शिक्षण खात्याने एक परिपत्रक जाहीर करून सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे गेल्या तीन दिवसापासून पूर्वतयारीसाठी शाळा व्यवस्थापन युद्धपातळीवर काम करीत होते. सत्तरीतील सर्व शाळातील शिक्षक पालकांनी विद्यालयाचे वर्ग सॅनिटायझर करून घेतले. सोमवारपासून सत्तरीतील सर्व शाळा गजबजलेल्या पहावयास मिळाल्या. अनेक शाळांनी मुलांना आनंदी मुद्रेत स्वागत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. काही शाळांनी मुलांचे फुल देऊन स्वागत केले तर काही ठिकाणी कुंकुमतिलक लावून त्यांचे पूजन केले. तर काही शाळांनी प्रवेशद्वारावर फ्ggढलांची सजावट केल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे वेगळाच माहोल आज सत्तरीत अनेक शाळांमध्ये पहावयास मिळाला.
हनुमान विद्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत
वाळपई शहरातील हनुमान विद्यालयात येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरहरी हळदणकर, मुख्याध्यापिका मीनल काणेकर व इतर शिक्षक उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षानंतर मुले पुन्हा एकदा शाळेत आली आहेत. वाळपई हनुमान विद्यालयाने आतापर्यंत चांगले शिक्षण देऊन समाजात वेगळा ठसा निर्माण केला आहे. विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यास महत्त्वाचे योगदान देतील, असे आश्वासन नरहरी हळदणकर यांनी दिले.
सरकारने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य आहे. यातून मुलांच्या वैचारिक प्रगल्भतेला वाव मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुले आळशी बनली आहेत. त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्यासाटी ऑफलाईन शिक्षण प्रणाली सुरू करणे गरजेचे होते. ती सुरू करण्यासाठी सरकारने उचललेले पावूल चांगले असल्याचे मुख्याध्यापिका मीनल काणेकर यांनी सांगितले.
हेडगेवार विद्यालयात कुंकूमतिलक लावून स्वगत
वाळपई येथील केशव बळीराम हेडगेवार विद्यालयात विद्यार्थ्यांचे कुंकूमतिलक लावून पूजन करून स्वागत करण्यात आले. यावेळी वाळपई हेडगेवार विद्यालयात मुलांनी मोठय़ा प्रमाणत नाव नोंदणी केली असून यंदा चांगला प्रतिसाद लाभला आहे. मध्यंतरी विद्यालयाचे वर्ग ऑनलाईन घेण्यात येत होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही ऑनलाईन घेण्यात आले होते. मात्र आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना संस्कारमय शिक्षण देण्यास मदत होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
मुलांच्या स्वागतासाठी गेल्या दोन दिवसापासून जोरात तयारी सुरू होती. शाळेचे शिक्षक व पालकांनी यासाठी योगदान दिले. भारतीय पद्धतीने कुंकूमतिलक लावून मुलांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. तसेच मुलांना पुष्पगुच्छ देऊन वर्गात बसविण्यात आले. प्रत्यक्ष शिकवणीला आजपासून सुरुवात झाली असल्याचे विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. अशोक आयशेकर यांनी सांगितले.
युनिटी विद्यालयात चॉकलेट,पेन देऊन स्वागत
वाळपई युनिटी विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने मुलांचे चॅकलेट व पेन देऊन स्वागत केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अश्रफ खान, विद्यालय शिक्षण व्यवस्थापन समितीचे सभासद व पालक उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मुलांनी रांगेत विद्यालयात प्रवेश केला. दोन वर्षानंतर प्रथमच मुलांनी शाळेमध्ये हजेरी लावल्याने त्यांना उत्साह निर्माण करण्यासाठी सदर प्रयत्न होते.
सरकारने दिलेल्या आदेशाला अनुसरून मुलांनी सोमवारपासून विद्यालयात हजेरी लावली. दोन वर्षांनंतर खऱयार्थाने शाळेमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. आता शाळेतील वर्ग गजबजणार असून मुले खेळायला आल्यावर पटांगणावर किलबिलाट सुरू होणार आहे. शाळा बंद असल्यामुळे गेल्या दोन वर्षात मुलांचे बरेच शैक्षणिक नुकसान झाले. आता चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक अश्रफ खान यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.