प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे यांच्या सांगली जिल्ह्यातील शिष्टमंडळ व जिल्हा प्रशासनासमवेत अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री यांच्याकडून आढावा घेण्यात आला.
चर्चेदरम्यान पंचनाम्यातील त्रुटी, झालेले झाडांचे नुकसान, विमा कंपन्यांची नियमावली यावर सविस्तर चर्चा केली. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी अविनाश काका पाटील यांच्यासह द्राक्ष बागातदार संघटना कृषी विभाग व जिल्हा परिषदेतील अधिकारी उपस्थित होते.