वैयक्तिक स्वास्थ्याच्या विचार करताना विज्ञानाने असे सिद्ध केले आहे की अनेक असाध्य रोगांचे कारण भावनिक किंवा मानसिक असते. अंतःस्रावी ग्रंथींच्या असंतुलनातून (प्arस्दहत् घ्स्ंaत्aहम) निर्माण होणारे विकार, हृदयविकार, कॅन्सर, रक्तासंबंधीचे आजार यासारख्या अनेक आजारांचे कारण नकारात्मक भावना हे असू शकते. अनेकदा आपल्याला पहायला मिळते की अतिशय रागीट व तापट माणसांना बहुतांश पित्ताचा त्रास, उच्च रक्तदाबाचा त्रास किंवा रक्तासंबंधी त्रास अथवा हृदयविकार असतो. अनेकदा मधुमेह, संधिवात यासारखे गंभीर आजार दाबून ठेवलेल्या नकारात्मक भावनांमुळे होतात.
द्विहृदय ध्यानसाधनेने या नकारात्मक भावनांचे रूपांतर उच्चस्तरीय भावनांमध्ये होते. उच्चस्तरीय भावनांमुळे आपल्या शरीरात अनेक रासायनिक प्रक्रिया घडतात, ज्यामुळे काही विशेष संप्रेरके शरीरात स्रवतात व रोगप्रतिकारक क्षमता वाढून आपले आरोग्य सुधारते. म्हणूनच आपण नेहमी बघतो की आनंदी, सकारात्मक व्यक्ती निरोगी असतात. द्विहृदय ध्यानसाधनेतून आपल्या वास्तूवरही सकारात्मक परिणाम होतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की, ज्या ठिकाणी आध्यात्मिक ऊर्जेचा स्तर अधिक असेल अशी जागा सगळय़ांनाच प्रसन्न व हवीहवीशी वाटते म्हणूनच अनेकदा मंदिरात गेल्यावर आपल्याला शांत व प्रसन्न वाटते. याउलट काही ठिकाणी गेल्यावर आपल्याला खूप अस्वस्थपणा जाणवतो.
द्विहृदय ध्यानसाधनेतून प्रचंड प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे एखाद्या जागी नियमितपणे ही साधना केली गेली तर ती जागा प्रचंड दैवी ऊर्जेने ओतप्रोत भरून जाते. तसेच प्रेमपूर्ण करुणाभावाने पृथ्वीला आशीर्वाद देताना आपण ध्यान करत असलेली जागाही प्रेमभावाने भरून जाते. परिणामी कालांतराने एक अनामिक प्रसन्नता, सकारात्मकता व चैतन्य येते. आपल्या आयुष्याचा एक मोठा कालखंड आपण घरात व्यतीत करतो अशावेळी जर आपले घर आपण एखाद्या मंदिराप्रमाणे प्रसन्न राखू शकलो तर आपले आयुष्य नक्कीच समाधानी होऊ शकेल. आपले शरीर, आपले घर याप्रमाणे आपले नातेसंबंधही आजारी पडू शकतात. नातेसंबंधातील प्रेम, आपलेपणा थोडा जरी कमी झाला तरी खटके उडायला सुरुवात होते. यावर उपाय म्हणून कुटुंबातील व्यक्तींनी एकत्र बसून द्विहृदय ध्यानसाधना केल्यास त्यातून निर्माण होणाऱया प्रेममयी ऊर्जेमुळे परस्परातील नातेसंबंध सुधारतात. एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाढतो व क्षमा करण्याची वृत्तीही वाढते.
सर्वसाधारणपणे एक दाखला आपल्या सर्वांनाच दिला जातो की पाणी संथ, शांत असेल तर त्याचा तळ स्वच्छ दिसतो. पाण्याला खळखळाट असेल तर मात्र त्यातून आरपार बघणे कठीण होऊन जाते. आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर प्रथम त्या खळखळत्या पाण्यावर म्हणजेच आपल्या मनावर ताबा आणणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्तम उपाय आहे ‘द्विहृदय ध्यानसाधना’.
आपल्या ऊर्जाशरीरावरील चपे विविध प्रकारच्या उर्जेशी निगडित असतात. काही चपे ही वैश्विक संवेदनशीलतेची केंदे असतात. या चक्रांच्या सक्रियतेवर आपली आध्यात्मिक प्रगती अवलंबून असते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सहाय्यभूत होणारे महत्त्वाचे चक्र म्हणजे सहस्रार (ण्rदैह ण्प्aक्ra) चक्र. सहस्रार चक्र हे दैवी ऊर्जेचे केंद्रस्थान आहे. परंतु सहस्रार चक्राच्या सक्रियतेसाठी अनाहत (पू ण्प्aक्ra) चक्र सक्रिय असणे अत्यावश्यक आहे. हार्ट चक्र हे मानवी प्रेमाचे तर क्राऊन चक्र हे वैश्विक प्रेमाचे केंद्रस्थान आहे. ही दोन चपे सक्रिय करण्याच्या व आध्यात्मिक प्रगती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. उदा. हठयोग, मंत्रोच्चार, प्राणायाम इ. परंतु या पद्धतींचे अपेक्षित परिणाम जाणवण्यासाठी अनेकदा दीर्घ कालावधी जातो. द्विहृदय ध्यानसाधनेच्या माध्यमातून ही दोन चपे जलद गतीने अनुभवता येतात. द्विहृदय ध्यानसाधनेत हार्ट व क्राऊन चक्र सक्रिय करून आपण पृथ्वीला प्रेमपूर्ण करुणाभावाने आशीर्वाद देतो. या प्रक्रियेत ही दोन चपे दैवी ऊर्जेचे माध्यम बनतात. जे तुम्ही द्याल ते अनेक पटींनी वाढवून तुम्हाला परत मिळेल या निसर्ग नियमानुसार जेव्हा आपण पृथ्वीला दैवी ऊर्जेने आशीर्वाद देतो तेव्हा आपल्यालाही अनेक पटींनी दैवी ऊर्जा मिळते. ही दैवी ऊर्जा आपल्यातील नकारात्मक विचार, भावना काढून टाकते, परिणामी मन शांत होते.
कुठल्याही देशातल्या संतांचे चरित्र बघितले तर लक्षात येईल की एक उत्तम साधक होण्याआधी ते एक उत्तम माणूस होते. प्रेम, क्षमा, दया, करुणा या उच्चस्तरीय भावनांनी ते परिपूर्ण होते. द्विहृदय ध्यानसाधनेने आपल्यातही उच्चस्तरीय भावना वाढीस लागतात परिणामी आपण फक्त स्वतःपुरताच विचार न करता सबंध विश्वाबद्दल सजग होतो. व्यक्तिगत स्तरावर या सात्विक भावना विकसित झाल्या की ईश्वर प्रेमाचा साक्षात्कार होण्याची संभावना निर्माण होते. अनेक ऋषी-मुनी आणि साधुसंतांनी ही गोष्ट हजारो वर्षांपूर्वीच ओळखली होती आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासूनच भक्तियोगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथांचे वाचन अथवा पारायण, भजन, कीर्तन, पूजन, सत्संग अशा भक्तियोगाच्या अनेक मार्गानी आपण ही चपे सक्रिय करू शकतो. परंतु सध्याच्या गतिमान युगात आपल्या सर्व जबाबदाऱया पार पाडून भजनपूजनादी सत्संगाला वेळ काढणे कठीण होऊन बसले आहे. वेळेचा अभाव आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव यामुळे तरुण पिढी आध्यात्मापासून वंचित राहते आणि आध्यात्म म्हणजे वृद्धत्वाचा उद्योग अशी धारणा होऊन बसते. हेच अंतर द्विहृदय ध्यानसाधनेने भरून काढले जाते.
अध्यात्मात समाधी अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी अष्टांग योगाचा मार्ग सांगितला आहे. समाधी ही त्यातील अखेरची पायरी असली तरी आधीच्या सात पायऱयाही तितक्मयाच महत्त्वाच्या आहेत. विशेषतः धारणा आणि ध्यान यांना महत्त्व आहे. द्विहृदय ध्यानसाधनेत अनाहत व सहस्रार चपे सक्रिय करून पृथ्वीला आशीर्वाद दिल्यानंतर ईश्वरी चैतन्यावर ध्यान व धारणा केली जाते. आपल्या सहस्रार चक्रावर एक तेजस्वी प्रकाशाची कल्पना करून ‘ॐ’ या मंत्राचा उच्चार केला जातो. या मंत्रोच्चारावर लक्ष केंद्रित करून दोन ॐ च्या मधील स्तब्धतेवर ध्यान केले जाते. या वेळात अनेक साधकांना अनेक अनुभव येतात. आपण दैवी प्रकाशाशी एकरूप झालो आहोत. सर्व शरीर दिव्य प्रेमाने ओतप्रोत भरून गेले आहे यासारखे अनुभव अनेकांना येतात.
द्विहृदय ध्यानसाधनेने प्रचंड प्रमाणात दैवी ऊर्जा साधकाच्या शरीरात येते व ती सबंध पृथ्वीभर पसरते. साधक दैवी ऊर्जेचा, दैवी प्रेम आणि करुणेचे एक माध्यम बनतो. अशा तऱहेने विश्वशांतीसाठी द्विहृदय ध्यानसाधना हा एक प्रभावी मार्ग आहे. जितके जास्त ईश्वरीप्रेम पृथ्वीतलावर अवतरेल तितक्मयाच जलद गतीने पृथ्वीवरील अनेक समस्यांचे निवारण होईल.
वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक, आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर यशस्वी होण्यासाठी द्विहृदय ध्यानसाधना अत्यंत उपयुक्त ठरते असे गेले दोन लेख आपण वाचत आहोत. हे खरंच घडते का असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनात येऊ शकेल त्यासाठी आता आपण द्विहृदय ध्यानसाधना करणाऱया काही साधकांचे अनुभव जाणून घेणार आहोत.
साधारणपणे वर्षभर नियमित ध्यानसाधना करणारे एक साधक सांगतात, ‘स्वतःच्या आणि इतरांच्या बाबतीत मी अधिक समंजस व सहनशील झाले आहे. माझा रागीटपणा कमी झाला आहे. दिवसाची सुरुवात मी द्विहृदय ध्यानसाधनेने करते त्यामुळे मला ईश्वरी प्रेमाचे संरक्षण मिळते असे मला वाटते. कधी कधी जे घडते ते अपेक्षेप्रमाणे नसले तरी त्यावर माझे नियंत्रण आहे आणि त्यातून चांगलेच घडेल असा माझा विश्वास असतो. हसतमुखाने जगणे, आपले काम करणे व देत राहणे हे मला सहज जमू लागल्याने जीवन अगदी मस्त चालले आहे’.
दुसरे एक साधक आपला अनुभव सांगताना म्हणतात, ‘प्राणिक हीलिंग कोर्स मध्ये मी जेव्हा ध्यानसाधना केली तेव्हा मला एका वेगळय़ाच मानसिक स्तब्धतेची जाणीव झाली. सरावाने ते नेहमीच होऊ लागले. सतत सुस्वास्थ्याची जाणीव होऊ लागली. काही काळ नियमितपणे ध्यानसाधना केल्यावर माझ्या जीवन उद्दीष्टांवर माझी एकाग्रता व लक्ष केंद्रित झाल्याचे मला जाणवू लागले. अप्रिय परिस्थिती व व्यक्तींशीही मी अधिक समंजसपणे वागू लागलो आहे. केवळ भावनाप्रधान न राहता, माझी पहिली प्रतिक्रिया आता वैचारिक स्तरावर होऊ लागली आहे. इतरांच्या तसेच स्वतःच्या भावना, विचार आणि सभोवतालच्या वातावरणाबाबत मी अधिक संवेदनक्षम झालो आहे. त्यामुळे माझे नातेसंबंधही सुधारले आहेत’.
ताणतणाव आणि धावपळीच्या आयुष्यात हेच काही शांत क्षण आपण शोधत असतो ना!
आज्ञा अभिषेक कोयंडे