गौरी आवळे / सातारा :
राजकारणातून वाटचाल करत महिला सक्षमीकरणाचे धोरण राबविणाऱ्या सोनाली पोळ यांच्या कामाची चर्चा जिल्हा परिषद कार्यालय ते राष्ट्रवादी पक्षात पोहोचली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कामाचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरू ठेवली आहे.
सोनाली पोळ यांचे वडील बाबुराव बापूसाहेब जाधव-इनामदार हे वाझर ता. सांगली गावचे 25 वर्ष सरपंच होते. गावच्या विकासासाठी त्यांनी विविध योजना राबविल्या. यामुळे गावात त्यांच्या कामाचा नेहमीच दबदबा पहायला मिळत होता. वडिलांच्या कामाचा प्रभाव सोनालीताईंच्या मनावर होत गेला. त्यांनी बी कॉम शिक्षण पूर्ण केले. त्यांचे लग्न मार्डी गावचे सरपंच मनोजकुमार पोळ यांच्याशी झाले. त्यांचे सासरे सदाशिवराव आबाजी पोळ हे आमदार होते. हा राजकीय वारसा पुढे नेहण्याचे त्यांनी ठरवले. 2017 ला त्यांनी सातारा जिल्हा परिषद ची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या. पहिली अडीच वर्ष त्या सदस्या होत्या. पुढच्या अडीच वर्षात राष्ट्रवादी पक्षाने चांगली संधी देत महिला व बालकल्याण सभापती पद दिले. सभापती पदासाठी भरघोस मतांनी त्या निवडून आल्या. ग्रामीण भागातील महिलांच्या गरजा ओळखून त्यांच्या विकासासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
शिलाई मशीन, पीठाची चक्की मिळवून दिल्या. वाडीवस्तीवरील महिलांना यांचा जास्त लाभ झाला. कोरोना काळात अंगणवाडी सेविका, मदतनीसांना माहिती गोळा करणे, कन्टेमेंट झोनमध्ये पाठविणे, वैयक्तिक लाभाच्या योजना चांगल्या प्रकारे राबविल्या. गेली दोन वर्षापासून 1 ते 30 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण अभियान जिह्यात राबविण्यात येत आहे. या माध्यमातून महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे, गर्भवती महिला, स्तनदा माता यांना सुविधा पुरविण्याची कामे केली. हे अभियान संपूर्ण जिह्यात यशस्वीपणे राबविण्यात आले. यामुळे या अभियानात सलग दोन वर्ष जिह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. कार्यालयात काम करताना त्या नेहमी सर्व कर्मचाऱयांना सोबत घेवून काम करतात. त्यांच्या कामाचा ठसा प्रत्येकांच्या मनात उमटत असतो. सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे. त्या सामाजिक उपक्रमही राबवत असतात. पदापेक्षा काम आणि कामापेक्षा माणसं त्यांना महत्त्वाची वाटतात.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार साहेबांनी महिलांना 50 टक्के आरक्षण मिळवून दिले. यामुळे महिला राजकारणात भक्कमपणे वाटचाल करत आहेत. कुणीतरी एखादी योजना राबविण्यापेक्षा महिलाकडे उपजत गुण असतो. महिलांनी स्वत:ची क्षमता ओळखली पाहिजे. तर त्या नक्कीच पुढे जातील. समाजात स्त्राr-पुरूष समानता राहिली पाहिजे. तरच कुटुंब व्यवस्था चांगली राहिली. आणि येणाऱया नव्या पिढीने नवे विचार घेवून वाटचाल केली पाहिजे. सर्वच क्षेत्रात काम करताना महिलांनी येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे लढा दिला पाहिजे.
-सोनाली पोळ, सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद