पाणी समस्या, पैकुळ पुलाच्या पुनर्बांधणीबाबत विचारला जाब
प्रतिनिधी /वाळपई
गेल्या आठवडय़ात वेगवेगळय़ा पैकुळ येथे पूल कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करण्याबाबत निवेदन शेळ मेळावली धडा पैकुळ भागातील ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांना सादर केले होते. या निवेदनाचा पाठपुरवठा करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार कार्यालयात जाऊन या संदर्भाची माहिती घेतली. अचानक मोठय़ा संख्येने आलेल्या ग्रामस्थांना पाहून सरकारची यंत्रणेची धांदल उडाली. यामुळे पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
दरम्यान, सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार दशरथ गावस यांच्याशी झालेल्या सविस्तरपणे चर्चेत गणेश चतुर्थीपूर्वी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात येणार असून नवीन पुलाच्या बांधकामाची कागदपत्रे सोपस्कार शक्मय तेवढय़ा लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन मामलेदारांनी दिले. तसेच रेशनिंगचा कोटा येणाऱया अवघ्या दिवसांमध्ये पैकुळ गावांमध्ये उपलब्ध करण्यात येणार, असे आश्वासन दिले आहे.
याबाबतची माहिती अशी की, 23 व 24 जुलै रोजी सत्तरी तालुक्मयाला पुराचा फटका बसून पैकुळ पूल कोसळला. यामुळे शेळ मेळावली धडा मुरमुणे आदी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी मोठय़ा प्रमाणात सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांना निवेदन सादर करून वेगवेगळय़ा समस्या संदर्भात सविस्तर माहिती चर्चा केली होती. या निवेदनातील समस्यांचे काय झाले यासंदर्भाची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी पुन्हा एकदा सदर ग्रामस्थांनी सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार दशरथ गावस यांची भेट घेतली. रगाडा नदीमधील पात्रात भूमिगत स्वरूपाची जलवाहिनी टाकण्यात येणार असून यासंदर्भाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे .त्याचप्रमाणे नवीन पुलाच्या प्रकल्पाची उभारणी गोवा पायाभूत साधनसुविधा मंडळातर्फे करण्यात येणार आहे. शक्मयतो येणाऱया दोन आठवडय़ांमध्ये या संदर्भातील निविदा जारी करण्यात येणार आहे .त्यानंतर लवकरच पुलाच्या उभारणीच्या कामाला प्राथमिक स्तरावर सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सध्यातरी पर्यायी व्यवस्था म्हणून धारबांदोडा तालुक्मयातील बोंडला गावातून या संदर्भाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच मार्गावरून रेशनिंगच्या कोटा पुरविणार असल्याचे मामलेदार दशरथ गावस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संदर्भात ग्रामस्थ अजित देसाई व शंकरा नाईक यांनी सांगितले की गणेश चतुर्थीपूर्वी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन मामलेदारांनी दिल्याचे सांगितले. दरम्यान, चतुर्थीपूर्वी पिण्याच्या पाण्याची समस्या न सुटल्यास मामलेदार व पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न ः मामलेदार दरम्यान या संदर्भात मामलेदार दशरथ गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मेळावली येथील मोठय़ा प्रमाणात आलेल्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान त्यांना योग्य स्तरावर गांभीर्याने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देण्यात आलेली आहे .एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ग्रामस्थ येण्याचे कारण काय? यासंदर्भात प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की हा प्रकार गैरसमजातून झालेला आहे. कारण पंचायत मंडळाला पैकुळ याठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या पुलाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले होते. त्यानंतर सरपंच अपूर्वा च्यारी व इतर पंच यांच्याशीच चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.