ऑनलाईन टीम/तरुण भारत
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषनं नुकतीच सोशल मीडियावरून त्याच्या घटस्फोटाची घोषणा केली आणि पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. पत्नी ऐश्वर्या रजनीकांतसोबत आपला १८ वर्षांचा संसार मोडत धनुष विभक्त झाला. त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दोघांच्या घस्फोटाच्या वृत्तानं त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता धनुषने सोमवारी आपला १८ वर्षांचा संसार मोडत, पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे होण्याची घोषणा केली. प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचे २००४ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत. धनुष आणि ऐश्वर्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपण विभक्त झाल्याची घोषणा देखील केली आहे.
धनुष्याने ट्विटरवर शेअर केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, “मित्र म्हणून, जोडपे म्हणून, पालक म्हणून आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून १८ वर्षांची सोबत राहिली. आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी जोडपे म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा स्वीकार करावा.” असं म्हणत धनुषने घटस्फोटा बाबतची माहिती दिली आहे. तर, अशाच पद्धतीची पोस्ट ऐश्वर्याने तिच्या इन्स्टा अकाउंटवर देखील केली आहे.