ऑनलाईन टीम/तरुण भारत
र्मसंसदेच्या कार्यक्रमांमध्ये कथितपणे केल्या जाणाऱ्या हिंदुत्वासंबंधी वादग्रस्त वक्तव्यांवर सरसंघघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी या वक्तव्यावंर असहमती व्यक्त केली असून हे कार्यक्रम हिंदू विचारसरणीचं प्रतिनिधित्व करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. धर्मसंसदेतून आलेल्या गोष्टी हिंदू आणि हिंदुत्वाच्या व्याख्येला अनुसरुन नसल्याचंही ते म्हणाले आहेत. नागपुरातील एका वृत्तपत्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता’ या व्याख्यानाला संबोधित करत असताना मोहन भागवतांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी धर्मसंसदेत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर नाराजी जाहीर करत सांगितलं की, “धर्मसंसदेच्या कार्यक्रमातून जे काही समोर येत आहे ते हिंदू शब्द, हिंदू कर्म किंवा हिंदू मन नाही”. असे म्हंटले आहे.
भारत ‘हिंदू राष्ट्र’ होण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर मोहन भागवत म्हणाले की, “हे हिंदु राष्ट्र बनवण्याबाबत नाही. भले एखाद्याने स्वीकारावे किंवा स्वीकारून नये. पण हे तेच (हिंदू राष्ट्र)आहे. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप हिंदुत्ववादी आहे. देशाच्या अखंडतेची भावनाही तशीच आहे. राष्ट्रीय अखंडतेसाठी सामाजिक समता कधीही आवश्यक नसते. फरक म्हणजे वेगळे होणे नव्हे.”
“संघाचा विश्वास लोकांमध्ये फूट पाडण्यात नसून त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात आहे, यातून निर्माण झालेली एकजूट अधिक मजबूत होईल. आम्हाला हे काम हिंदुत्वाच्या माध्यमातून करायचे आहे.” असही ते म्हणाले.
वीर सावरकरांनीही सांगितले होते की, जर हिंदू समाज एकजूट आणि संघटित झाला तर ते भगवद्गीतेबद्दल बोलतील, कोणाला संपवण्यावर किंवा इजा करण्यावर बोलणार नाही.” असं देखील सरसंघचालक मोहन भागवत सांगितले.