राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेशकुमार यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
धर्मांतराच्या घटना या देशाच्या एकात्मतेसाठी आणि सुरक्षेसाठी धोकादायक असून त्यांच्यामुळे सामाजिक ताणतणाव निर्माण होतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेशकुमार यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारच्या धर्मांतरविरोधी विधेयकाचे समर्थन संघ करीत आहे. हे विधेयक उचित आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.
लव्ह जिहाद रोखण्यासाठी कर्नाटक सरकार करणार असलेल्या कायद्याचेही त्यांनी समर्थन केले. कर्नाटक सरकार लवकरच ही विधेयके विधानसभेत सादर करणार आहे. काँगेसने या विधेयकांना विरोध केला आहे. ज्यांना धर्मांतर करायच असेल त्यांनी जिल्हय़ाच्या उपायुक्तांसमोर दोन महिने आधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अनिवार्य तरतूद या विधेयकात आहे अशी चर्चा आहे. तसेच धर्मांतर घडविणाऱयांना शिक्षा करण्याची तरतूदही या विधेयकात आहे.
धर्मांतर घटनाबाहय़ कृती
कोणाचेही धर्मांतर करणे ही कृती बेकायदेशीर, घटनाबाहय़ आणि अमानवी आहे. यामुळे धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण होते. नैतिकदृष्टय़ाही धर्मांतर ही पापकृती आहे, असे प्रतिपादन इंदेशकुमार यांनी केले. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि इतर काही राज्यांनी अशा प्रकारचे कायदे संमत केले आहेत.