भारतातील कृषितज्ञांनी सर्फेस ड्रिप इरिगेशन नामक नवे तंत्रज्ञान शोधले आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱया पाण्याची फार मोठय़ा प्रमाणावर बचत होणार आहे. जलसंरक्षण हा भविष्यकाळात सर्वात मोठा प्रश्न म्हणून उभा राहणार असून त्यावर हे तंत्रज्ञान रामबाण उपाय ठरेल, असा दावा करण्यात येत आहे.
या तंत्रज्ञानाच्या उपयोगाचा प्रारंभ हरियाणामध्ये यंदाच्या वर्षापासून होणार आहे. पाच वर्षाच्या अखंड संशोधनानंतर हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याचे प्राथमिक प्रयोग अपेक्षेपेक्षाही अधिक यशस्वी ठरले आहेत. काही निवडक शेतांमध्ये याचे फायदे दिसून आल्यानंतर सर्व शेतकऱयांना या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे एक किलो धान्य उत्पादित करण्यासाठी 3 हजार लिटर पाणी लागते. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या पाण्यात 50 टक्क्मयांची बचत होणार आहे. त्यामुळे जमिनीचा कसही चांगल्या प्रकारे प्रदीर्घ काळ टिकून राहून धान्योत्पादन वाढण्याची शक्मयता आहे. तसेच पाणीबचतीमुळे पिण्याच्या पाण्याची कमतरताही कमी होणार आहे.