महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष
वेतवडे/प्रतिनिधी
धामणी खोऱ्यातील वेतवडेपैकी भेंडाई धनगरवाडा ता. पन्हाळा येथे गेली २१ दिवस वीज नसल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराविषयी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीतपणे सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
वेतवडे पासुन 3 किमीच्या अंतरावर डोंगरात भेंडाई धनगरवाडा आहे. तेथे 150 नागरिक रहात असुन गेली 20 ते 21 दिवसांपासून याठिकाणी वीज नसल्याने भेंडाई धनगरवाडा अंधारात आहे. वेतवडे ता. पन्हाळा सबस्टेशन अंतर्गत हे ठिकाण येत असुन कोणीही कर्मचारी तेथे जाऊन वीजदुरुस्ती करण्यास तयार नाही. वरिष्ठांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे प्रशासनाने व स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.