म्हासुर्ली / वार्ताहर
गवशी – भित्तमवाडी (ता.राधानगरी) दरम्यान धामणी नदी वर असलेल्या बंधाऱ्या जवळ पाणी पिण्यास गेलेल्या भिकाजी हरी कांबळे (वय-३८,वेतवडे,ता.पन्हाळा, सध्या म्हासुर्ली) या तरुणाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यु झाला.यांची नोंद राधानगरी पोलिसात करण्यात आली आहे.
भिकाजी कांबळे हा सध्या म्हासुर्ली येथून वारंवार गवशी येथील आपल्या मामाच्या घरी असलेल्या आईला भेटण्यास येत असे,दरम्यान गवशी-भित्तमवाडी दरम्यानच्या बंधाऱ्या लगत कांबळे पाणी पिण्यास गेला असता त्याचा तोल गेल्याने पाण्यात पडला. मात्र त्यास पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यु झाला. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता कांबळे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. सदर घटनेची वर्दी राधानगरी पोलिसात त्याच्या मावस भाऊ प्रकाश कांबळे यांनी दिली असून अधिक तपास पोलिस नाईक खामकर करत आहेत.