भात व ऊस शेतीचे नुकसान
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवर असणाऱया धामणे (एस) येथे टस्कराचा धुमाकूळ सुरू आहे. या टस्कराकडून भात व ऊस शेतीचे नुकसान होत आहे. भात व ऊस ही दोन्ही पिके आता ऐन भरात असताना टस्कराकडून नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱयांनी केली आहे.
आजरा, चंदगड, गडहिंग्लज व तिलारी धरणाच्या परिसरात दरवषी हत्ती दाखल होतात. या वषीही धामणे (एस), तुडये, तिलारी नगर या परिसरात एक टस्कर दाखल झाला आहे. या टस्कराकडून मोठय़ा प्रमाणात शेतीचे नुकसान करण्यात येत आहे. भात पिकाची कापणी व मळणी सुरू असताना टस्कर दाखल झाल्याने हाता तोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. ऊस तोडणी केली जात असतानाच टस्कराकडून नुकसान होत आहे. यामुळे अस्मानी सुल्तानी संकटांना शेतकरी सामोरे जात आहेत.
शेतकऱयांचे नुकसान होऊनदेखील वन विभागाकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होत असून, वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱयांनी केली आहे. टस्करामुळे लक्ष्मण पाटील, प्रकाश पाटील, धाकलू पाटील, भरमा गावडे, गोविंद चौकुळकर यांच्यासह इतर शेतकऱयांचे नुकसान झाले आहे.