धारवाड/प्रतिनिधी
राज्यात पूर्ण लॉक डाऊननंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. दरम्यान धारवाड जिल्ह्यात कोरोना प्रकरणांची संख्या कमी होऊ लागल्याने धारवाड जिल्हा प्रशासनाने २१ जूनपासून काही अटींनुसार विवाह सोहळयास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात प्रत्येक दिवशी कोरोना सकारात्मकतेचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात कोरोना सकारात्मकता दर ४.५ होता. एप्रिलपासून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले त्यामुळे लग्न सोहळे रद्द किंवा पुढे ढकलणे भाग पडले. दरम्यान कोरोनामुळे जिल्ह्यातील विवाहसोहळे आणि इतर उत्सवांवर बंदी घातली होती.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. राज्यात दररोज ५० हजाराच्यापुढे कोरोनाचे रुग्ण सापडत होते. राज्यातील कोरोनाचा डोकं ओळखून कर्नाटक सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन अंतर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. यांनतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. दरम्यान राज्यात ३० जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यात २१ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यात कोरोना सकारात्मकता दर कमी कमी होत चालल्याने २१ जूननंतर राज्यात निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सूचित केले आहे.