वेंगुर्ल्यातील इको प्रेंडली मूर्तीकार हेमंत मठकर यांचे मत : समाजात प्रबोधन होणे गरजेचे!
के. जी. गावडे / वेंगुर्ले:
कोकणात गणेश चतुर्थी हा जिव्हाळय़ाचा, उत्साहाचा व चैतन्याचा सण. घराघरात श्रीगणेश मूर्ती पूजन केले जाते. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे वाढते प्रमाण व त्या गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन केल्याने पाणीसाठ दूषित होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यास कारक ठरत आहेत. मात्र, काळाची गरज ओळखून पारंपरिक शाडूची (शेत जमिनीतील) माती व कागदी लगदे (इको प्रेंडली) यापासून सुबक गणेश मूर्ती साकारुन गेली पाच वर्षे वेंगुर्ले तालुक्मयातील वायंगणी-हरिचरणगिरी येथील मूर्तीकार हेमंत मठकर खऱया अर्थाने पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करीत आहेत. जिल्हय़ात सर्वच ठिकाणी अशाप्रकारे इको प्रेंडली गणेशमूर्ती साकारल्यास जलप्रदूषण नक्कीच रोखू शकेल. मात्र, त्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी समाजात प्रबोधन होणे आता काळाची गरज बनली आहे.
गेल्या तीन पिढय़ांपासून मठकर कुटुंबियांची मूर्ती शाळा वेंगुर्ले तालुक्मयातील हरिचरणगिरी या गावात आहे. त्यांचा वारसा मूर्तीकार हेमंत मठकर यांनी जपत दरवषी नावीन्यपूर्ण कलेतून आपला वेगळेपणा मूर्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावातून शेतजमिनीतील माती आणून त्यापासून सुबक मूर्ती बनवायचा ध्यास त्यांनी कधीच सोडला नाही. या मूर्ती वजनाने जड असल्या तरीही कलाकुसरीच्या जोरावर गणेशप्रेमींना आकर्षक वाटत. त्यानंतर ईको पेंडली गणपती करण्याकडे त्यांचा कल वाढला व कागदी लगद्याच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. वजनाने हलक्मया व अधिकच सुबक असलेल्या या मूर्तींना लोकांचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला. लोकांच्या वाढत्या मागणीमुळे मे महिन्यातच मूर्ती शाळेमध्ये काम सुरू केले. मदतीसाठी गावातीलच हौशी युवकांना काम दिल्याने त्यांनाही रोजगाराचे साधन गावातच उपलब्ध झाले. मात्र, गणेश मुर्ती साकारताना त्या शेत जमिनीतील माती व कागदी लागद्यापासूनच बनविण्याचा त्यांचा पूर्वीपासूनच कटाक्ष राहिला. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्याने वाढत्या जलप्रदूषणामुळे जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. धार्मिकता जपताना निसर्गाचा समतोल राखणे तेवढेच गरजेचे असल्याने शेतीतील माती व कागदी लगद्यापासून मूर्ती तयार करण्यावर भर असल्याचे मठकर आवर्जुंन सांगतात. दिवसेदिवस प्रदूषणाचा विळखा वाढत असताना पर्यावरणपूरक मुर्त्यांवर भर दिला जात आहे हे चित्र आशादायक आहे. इको प्रेंडली गणपतीमुळे पर्यावरणाचा समतोल राहील यावर मूर्तिकारांबरोबरच गणेश भक्तांनी पुढाकार घेऊन खारीचा वाटा उचलने ही आता काळाची गरज आहे. कागदाच्या लगद्यापासून बनविलेली गणेश मूर्ती नदी पात्रातील पाण्यात अगदी सहज विरघळते. ही मूर्ती तयार करण्यासाठी कागद, टिशुपेपर, माती, वॉटर कलर, भाज्यांपासून तयार रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड आदी साहित्य लागते.
जमिनीतून माती काढून त्यापासून गणेश मूर्ती व आता कागदी लगद्यापासून मूर्ती बनवायचा ध्यास न सोडल्याने अशक्मय गोष्टी सहज साध्य झाल्या. त्यातूनच मूर्तीकार संघटना निर्माण झाली. त्या संघटनेचा आपण एक भाग बनलो. आपल्या मूर्ती कलेला दाद देऊन बापू सावंत यांनी प्रोत्साहन दिल्याने नवनवीन मूर्ती बनविणे सोपे झाले. जिल्हय़ातील मूर्तिकारांची ओळख होऊन संघटनेच्या माध्यमातून इको प्रेंडली मूर्ती बनविण्याच्या कार्यास हातभार लागला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व भगीरथ प्रति÷ानचे डॉ. देवधर यांची साथ तेवढीच महत्वाची. शासनाने मूर्ती शाळांना प्राधान्य देऊन मूर्तिकारांच्या अनेक प्रश्न सोडविण्याची गरज आहे. कोरोना महामारीचा सगळय़ाच मूर्तिकरांना फटका बसला शहराबाहेरील मूर्तींची मागणी असतानाही त्या पूर्ण करता आल्या नाहीत, असे मठकर यांनी सांगितले.