पाणीपुरवठा यंत्रणेची धावपळ : दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन : पंपात बिघाड असल्याने समस्या
प्रतिनिधी /वाळपई
नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील धावे तार वाडय़ावरील पाण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर संतप्त महिला भगिनी आज वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा काढला. यानंतर पाणीपुरवठा खात्याच्या आधिकाऱयांची धावपळ उडाली. अधिकाऱयांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन एकूण परिस्थितीची पाहणी करुन समस्या तातडीने सोडविण्याचे असे आश्वासन दिले.
वाळपई मतदारसंघाच्या नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे याठिकाणी गेल्या एक महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे. सुमारे पंधरा घरांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत अनेक वेळा स्थानिक पंच सभासदांकडे सुद्धा तक्रार करण्यात आली. मात्र त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचा दावा यावेळी महिलांनी केला. अखेर इशाऱयानुसार महिलांनी वाळपईच्या पाणीपुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा नेऊन आपला संताप व्यक्त केला.
याची दखल घेत पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकारी स्नेहा यांनी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली. सदर ठिकाणी असलेला पंप नादुरुस्त बनलेला आहे. यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. हा पंप बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती स्नेहा यांनी यावेळी दिली. दोन दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या कोणत्याही परिस्थितीत निकालात काढणार, असे आश्वासन यावेळी स्नेहा यांनी दिले.
दिवसभर फक्त एक घागर पाणी नळाला येते. यामुळे खास करून महिलांना याचा बऱयाच प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांत ही पाण्याची समस्या न सोडविल्यास वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर पुन्हा घागर मोर्चा काढण्याचा इशारा धावे तार वाडय़ातील महिलांनी दिला आहे.