बेळगाव शहराच्या दैनंदिन जीवनाचा प्रवास आता अगदी भल्या पहाटेपासूनच सुरू होऊ लागला आहे. सकाळी सातच्या सुमारास शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी पायी चालत किंवा वाहनांनी इच्छित ठिकाणी पोचताना दिसतात. त्यामुळे पहाटेच्या वेळेपासूनच जाग्या होणाऱया शहराचे चित्र आता नव्या स्वरूपात दिसते आहे. शुक्रवारी पहाटे या दैनंदिन प्रवासाला दाट धुक्मयाची भरगच्च सोबत लाभली होती. धुक्मयाच्या वलयात गुरफटलेल्या शहराचा चेहराच काही वेगळा भासत होता. आपण बेळगावात आहोत की अन्य कोणत्या शहरात, अशीच अनेकांची प्रतिक्रिया होती.
शहर आणि परिसरात शुक्रवारी पहाटे दाट धुक्मयाची दुलई पसरली होती. संक्रांतीच्या सणानंतर खरे तर उन्हाची तीव्रता वाढण्याचे दिवस अपेक्षित आहेत. परंतु शुक्रवारी पहाटे दाट धुक्मयाचा वेढा शहराभोवती निर्माण झाला. सकाळी सहाच्या सुमारास हळूहळू जाग्या होणाऱया शहराला धुक्मयामुळे पहाट झाल्याची जाणीवही होण्यास उशीर लागला. सुमारे साडेआठ वाजेपर्यंत हा धुक्मयाचा प्रभाव टिकून होता. त्यानंतर हळूहळू सूर्यदेवाचे दर्शन झाले. आणि शहराची वेगळी ओळख अनुभवल्याचा आनंद घेता आला.
तरुण भारतच्या वाचकवर्गाने टिपलेल्या या आगळय़ा धुके सोहळय़ाची झलक …