भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ कडाडल्या, : निलंबन न केल्यास भाजप आंदोलन छेडणार
प्रतिनिधी /सातारा
सातारच्या गटशिक्षणाधिकाऱयाकडून महिला शिक्षिकेचा विनयभंग असले प्रकार घडतातच कसे. अशा विकृत अधिकाऱयांना डिपार्टमेंटमध्ये राहणाऱयाचा अधिकार नाही. पोलिसांनी त्याची पोलीस कस्टडी वाढवून त्याची आणखी चौकशी करायला पाहिजे होती. त्याच्यावर शासनाकडून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यत भाजपा महिला आघाडी गप्प बसणार नाही, असा इशारा भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
दरम्यान, त्यांनी राज्यातील वाढत चाललेल्या महिला अत्याचार प्रकरणावरुन सरकारचा समाचार घेतला. राज्य सरकारकडून ठोस पाऊल उचललं जात नाही. मंत्रीच बलात्कार करु लागलेत तर अधिकाऱयांचे काय असा त्यांनी आरोप केला.
सातारा दौऱयावर आलेल्या भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सातारा जिह्यातील ज्या ज्या महिला, युवतींवर अत्याचार झालेला आहे, त्यांची भेट घेतली. तसेच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेवून त्यांनी महिला अत्याचाराच्या मुद्यावर प्रखरपणे कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी हेमांगी जोशी, सुनेशा शाह, दीपीका झाड, नेहा लाटकर, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेठवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, माजी नगरसेवक ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. राज्यात लिंगपिसाट लोकांचा भरणा झाला आहे. काल औरंगाबाद जिह्यातील सिल्लोड तालुक्यातील भिल्ल जातीच्या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. ती महिला पोलिसांकडे गेली तर पोलीस कर्मचारीच शरीरसुखाची मागणी करत होता. लातूर जिह्यातील अनुकंपा तत्वावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून सामाजिक कार्यकर्त्याने युवतीचे नैतिक अधपतन केले. परवा साताऱयाचे गटशिक्षणाधिकाऱयाने शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे उघकडीस आले. त्याला लाज कशी वाटली नाही की असे वागताना त्या महिलेशी भेटले जाणून घेतली तिची समस्या. ती तक्रार आल्यानंतर विशाखा समिती नेमली आहे. विशाखा समिती सगळय़ा शासकीय, निमशासकीय कार्यालयात असणे गरजेचे आहे. एक शिक्षिका अन्यायाविरोधात पुढे आल्यानंतर विशाखा समिती गठीत होते. ही दुर्दैवाची बाब आहे. गटशिक्षणाधिकाऱयासारख्या विकृत लोकांना डिपार्टमेंटमध्यें राहण्याचा अधिकार नाही. त्याला अटक केल्यानंतर त्याची पीसी वाढवून पोलिसांनी त्याची चौकशी करायला हवी होती. एकंदरीत असे झाले नाही. जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही महिला शांत बसणार नाही, असा इशारा दिला.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीकास्त्र पालकमंत्री म्हणजे काय हो ? जिह्याचे पालक ना. मग एवढे महिलांवर अत्याचार होत आहेत. कुठे आहेत हे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री. त्यांनी का भेट दिली नाही, आहेत कुठे हे मंत्री, असा प्रश्न उपस्थित करत कोरोना काळात ज्या महिला अत्याचाराच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्याची समरी काढू नये. आताच्या घडीला कौन्सिलिंग महत्वाचे आहे. जनजागृती महत्वाचे आहे. सरकार कोणतेही असले तरीही महिलांवरील अत्याचार थांबले नाहीत. परंतु सध्याचे सरकारला हे अत्याचार दिसत नाहीत. मंत्रीच बायकांवर बलात्कार करु लागलेत तर तेही अधिकारी पोसतात, असा आरोप त्यांनी केला.