बेळगाव : शनि मंदिरनजीक असलेल्या शेरी गल्लीच्या वळणावर धोका निर्माण झाला आहे. येथील गटारीवरील फरशा खचल्याने नजरचुकीने दुर्घटना घडण्याची शक्मयता आहे. गटारीवर घातलेल्या काँक्रीटमधून लोखंडी सळय़ा बाहेर आल्या आहेत. नेहमी रहदारी असलेल्या मार्गावर सदर समस्या उद्भवल्यामुळे नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रविवार पेठ, कलमठ रोड, शनिमंदिर, अनसुरकर गल्ली आणि शेरी गल्लीत हजारो व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे सदर मार्गांवर नागरिकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे घाईगडबडीत किंवा नजरचुकीने येथील वळणावर नागरिक अडकून पडण्याचा धोका आहे. या भागात हमालवर्गाची संख्या जास्त असल्याने हातगाडी अडकून राहण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्येचे त्वरित निवारण करावे, अशी मागणी होत आहे.
Previous Articleबेंगळूरमध्ये 80 कोटीचे अंबरग्रीस जप्त
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.