ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 11 हजार 147 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 11 हजार 798 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात 266 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी एका दिवसात 8860 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 2 लाख 48 हजार 615 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या राज्यात 1 लाख 48 हजार 150 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 14 हजार 729 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.37 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 3.58 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 9 लाख 04 हजार 141 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 40 हजार 546 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.