खानापूर / वार्ताहर
नंदगड येथील जेसीएस शाळा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिकून गेले आहेत. मराठी व कन्नड प्राथमिक शाळा अशा संयुक्तरित्या सुरू असलेल्या या शाळेच्या विलीनीकरणाचा घाट शिक्षण खात्याने घेतला आहे. या दोन्ही शाळांमध्ये कन्नड व मराठी माध्यमाची अनेक मुले शिकतात. पटसंख्येच्या बाबतीत यावषी थोडाफार परिणाम झाला असला तरी नंदगड परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेत शिकतात. शाळेच्या विलीनीकरणास नंदगड गावातील पालकांकडून व शिक्षणप्रेमांकडून विरोध असतानाही गट शिक्षणाधिकाऱयांकडून घाई केली जात आहे. याबद्दल एसडीएमसी, पालक आणि ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात गावातील नागरिक व पालकांनी शाळेचे विलीनीकरण करू नये, अशी मागणी शिक्षण आयुक्त आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱयांकडे केली आहे.
1845 पासून सदर शाळेत मराठी आणि कन्नड मुला-मुलींची वेगळी शाळा आहे. पटसंख्येचे कारण दाखवून केवळ मराठी शाळेचे विलीनीकरण करण्याचा घाट गट शिक्षणाधिकाऱयांनी घातला आहे. दोन्ही शाळांमध्ये पुरेशी पटसंख्या आहे. केवळ मराठीच्या पोटशुळामुळे शिक्षण खात्याकडून पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. शाळेचे विलीनीकरण केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. पुंडलिक कारलगेकर, विजय कामत यांनी विलीनीकरणाला विरोध करत शिक्षण आयुक्तांना निवेदन पाठविले आहे.
या शाळांची स्थिती चांगली असूनही केवळ मराठी शिक्षकांची संख्या कमी करण्याच्या भावनेतून हा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तो अन्याय करणारा असून त्वरित मागे घ्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे.