कल्लोळ, मांजरी, लोळसूर, कुडची पुलाची पाहणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावसह संपूर्ण जिल्हय़ात सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली असून नदीकाठावरील गावकऱयांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे. रविवारी चिकोडी, कागवाड, रायबाग, गोकाक तालुक्मयांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी वरील आवाहन केले आहे.
कल्लोळ, मांजरी, कुडची व लोळसूर पुलाची पाहणी त्यांनी केली. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्याचा प्रवाह वाढला आहे. कर्नाटकातील धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे सध्या तरी पुराचा धोका नाही. महाराष्ट्रातील धरणातून पाणी सोडण्याआधी त्यासंबंधीची पूर्वसूचना देण्यात येणार आहे. तेथील पाटबंधारे अधिकाऱयांनी यासंबंधी कळविले आहे. स्थानिक अधिकारी सातत्याने महाराष्ट्रातील अधिकाऱयांशी संपर्क ठेवून आहेत, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
अतिवृष्टी असो किंवा पूर असो. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नदीकाठावरील गावकऱयांनी मात्र खबरदारी बाळगावी. आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी स्थळनिश्चिती करण्यात आली आहे. तालुकानिहाय नोडल अधिकाऱयांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., प्रांताधिकारी युकेशकुमार व त्या त्या तालुक्मयांचे तहसीलदार उपस्थित होते. कल्लोळ, मांजरी, लोळसूर आदी पुलांना भेटी देऊन अधिकाऱयांनी नदीप्रवाहाची माहिती घेतली. नागरिकांबरोबरच परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकाऱयांनीही सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.